नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीत घातलेल्या निर्बंधामुळे रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी आज मुंबईत परतले. हे विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यापैकी ४७० विद्यार्थी महाराष्ट्रातले होते.
प्रत्येक विद्यार्थ्याने या प्रवासाच्या तिकीटासाठी ४०० डॉलर्स दिले होते. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.