महाराष्ट्रात, गुजरातमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचं  रूपांतर चक्री वादळामध्ये होऊन, येत्या ३ जूनपर्यंत ते  महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकेल, असा अंदाज  हवामान विभागानं वर्तवला आहे.

यामुळे समुद्र खबळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केलं आहे. गेल्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, लातूर, हिंगोली, सिंधुदुर्गासह कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल वर्धा इथं ४३ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन  दिवसांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image