डाळींच्या क्षेत्रात २०२७ पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २0२७ पर्यंत भारत डाळींच्या उत्पादनात  स्वावलंबी होईल, असं  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी म्हटलं आहे. मूग आणि चणाडाळ उत्पादनात भारत आत्मनिर्भर आहे, पण इतर डाळींच्या बाबतीत आपण आजही आयातीवर अवलंबून आहोत, असं ते म्हणाले.

नवी दिल्ली इथं तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणी, खरेदी आणि देयक वितरणासाठीच्या पोर्टलचं उद्घाटन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते.  देशातले शेतकरी या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image