डाळींच्या क्षेत्रात २०२७ पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २0२७ पर्यंत भारत डाळींच्या उत्पादनात  स्वावलंबी होईल, असं  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी म्हटलं आहे. मूग आणि चणाडाळ उत्पादनात भारत आत्मनिर्भर आहे, पण इतर डाळींच्या बाबतीत आपण आजही आयातीवर अवलंबून आहोत, असं ते म्हणाले.

नवी दिल्ली इथं तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणी, खरेदी आणि देयक वितरणासाठीच्या पोर्टलचं उद्घाटन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते.  देशातले शेतकरी या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.