देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी प्रधानमंत्र्यांची टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर  या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपा संसदीय सदस्यांच्या बैठकीत केली. संसदेतील सुरक्षा व्यवस्थेबद्दल गदारोळ करणाऱ्या खासदारांच्या निलंबनावर ते या बैठकीत बोलत होते. या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.