लातूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्ववत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांमुळे लातूर जिल्ह्यात गेले पाच दिवस बंद असलेली एसटीची वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव लातूर, अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि औसा आगारांमधून एकही बस बाहेर पडल्या नव्हत्या. त्यामुळे दररोजच्या अडीच हजार फेऱ्यातून दिवसाला मिळणारं जवळपास ५० लाख रुपयांचं उत्पन्न बंद झालं होतं. त्यामुळे एसटी ला पाच दिवसांत सुमारे अडीच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image