कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासाठी कृषी विद्यापीठाची रिकामी ३० हेक्टर जागा वापरावी आणि विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना पवार यांनी काल केली. या संदर्भात मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा एक चांगला पर्याय आहे, असंही पवार म्हणाले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी असे निर्देशही अजित पवार यांनी अन्य एका बैठकीत दिले. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image