नवी दिल्लीतील G-20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल - एस. जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवी दिल्ली इथं आयोजित १८ व्या जी -20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल, असं  परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते आज नवी दिल्लीत बोलत होते. रशिया आणि चीनचे अध्यक्ष या शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या वृत्ताबाबत प्रश्न विचारला असता, जयशंकर म्हणाले की, कोणता देश कधी येणार यापेक्षा आल्यावर तो कोणती भूमिका घेणार, हा खरा मुद्दा असून त्यावर लक्ष दिलं पाहिजे. भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकी संघाला जी -20 समुहात सहभागी करुन घेण्याबाबत विचारलं असता, या शिखर परिषदेत ते घडू नये, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image