जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली चिंता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण सुसंगत शेती या विषयावरच्या तीन दिवसीय जी- 20 तांत्रिक कार्यशाळेचं उद्घाटन यांच्या हस्ते आज हैदराबादमधल्या शमशाद इथं करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात जी- 20 देश आणि निमंत्रित देशांमधून भारत आणि परदेशातले 100 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कृषी क्षेत्र हे सर्वात संवेदनशील असल्याचं दिसतं आणि हवामान बदलामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आणि कृषी क्षेत्रावर हवामान बदलाचा परिणाम अधिक जाणवत आहे. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image