प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. या योजनेचा १४ वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. यामध्ये राज्यातल्या ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी, ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे. १२ लाख शेतकरी पात्र असूनही, भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसणं, ई-केवायसी नसणं तसंच बँक खात्याशी आधार संलग्न नसणं, या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत. स्थानिक प्रशासनानं असे शेतकरी शोधून  तीनही अटींची पूर्तता करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image