दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नाही- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नसल्याचं परखड मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या आभासी माध्यमाद्वारे आयोजित परिषदेला त्यांनी संबोधित केलं. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांचा कठोर शब्दात निषेध करायला हवा, असं सांगून दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचं आवाहन त्यांनी एससीओच्या सदस्य देशांना केलं. या परिषदेत एससीओच्या सदस्य देशांनी नवी दिल्ली कराराला मंजुरी दिली. दहशतवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांच्या विरोधात लढण्यासाठीची वचनबद्धता यात अधोरेखित करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांसाठीचा वित्तपुरवठा रोखणं, युवकांमधील कट्टरतावादाला आळा घालण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे.