देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६ या वर्षी २४ पूर्णांक ८५ शतांश असलेली गरिबांची संख्या २०१९- २० या वर्षात १४ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाली आहे. म्हणजे पाच वर्षांत १३ कोटी ५० लाख लोकांची दारिद्रयातून सुटका झाली. त्यानंतर नवी दिल्लीत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं निर्धारित उद्दिष्ट भारत वेळेपूर्वी कितीतरी आधी गाठेल असं त्यांनी सांगितलं. याच पाच वर्षांत ग्रामीण भागातली गरिबी ३२ पूर्णांक ५९ शतांश टक्क्यावरून कमी होऊन १९ पूर्णांक २८ शतांश टक्के होईल, असं अहवालात म्हटलं आहे.