आषाढी यात्रेत सहभागी वारकर्‍यांना उष्माघात आणि उन्हाचा त्रास होवू नये यासाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी यात्रेत सहभागी वारकर्‍यांना उष्माघात आणि उन्हाचा त्रास होवू नये यासाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. यात्राकाळात वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये तसंच औषधोपचाराबरोबर स्वच्छता आणि इतर आवश्यक गोष्टी तातडीनं उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

आषाढी वारीत पालखी सोहळ्याबरोबर तसंच पायी चालत येणार्‍या वारकर्‍यांची संख्या मोठी असून सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशादरम्यान आहे. वारकर्‍यांना साध्या टँकरमधून थंड पाणी देणे शक्य होत नाही.

त्यामुळे विविध दूध संघाकडे असणार्‍या चिलिंग प्लॅन्ट मधून हे पाणी थंड करण्यात येणार आहे. दूध संघाकडील टँकरच्या माध्यमातूनच थंड पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे.  

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image