मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांनी काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि त्यांना मणिपूर मधल्या सद्य परिस्थतीची माहिती दिली. गृहमंत्र्यांच्या देखरेखीखाली राज्य आणि केंद्र सरकार गेल्या आठवड्यात हिंसाचारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलं असल्याचं सिंग यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या भागात १३ जून नंतर हिंसक आंदोलनामुळं एकही मृत्यू झालेला नाही, तसंच  केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर मध्ये परिस्थती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल असं आश्वासन दिलं  आहे, अशी  माहिती  सिंग यांनी दिली आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं अधिक सक्षमपणे प्रयत्न करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी  मणिपूर सरकारला दिले आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image