बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते झालं. दादर इथल्या स्वामी नारायण मंदिर योगी सभागृह इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. देशात ५ कोटी खटले प्रलंबित असून, या खटल्यांना दिरंगाई होत आहे. अजून प्रलंबित खटले वाढत आहेत. आता ई फाईलिंगद्वारे कामे जलद होतील असं यावेळी किरेन रिजीजू यांनी यावेळी म्हटलं.

२०१४ नंतर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात सरकारनं क्रांतिकारी पाऊले उचलली आहेत. १९४७ पासूनचे जुने कायदे काढून टाकण्यात आले आहेत, अजून काही कायदे हटवण्याचं काम सुरू आहे असही त्यांनी यावेळी सांगितलं . विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आवश्यक आहे.आपली कामे जलद गतीनं करायची असतील, तर असे निर्णय घेणं आवश्यक आहे. ठाण्यात जी जागा प्रस्तावित जागा आहे, ती सरकार नक्की देईल. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं ही जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यतले अनेक मंत्री आणि खासदार उपस्थित होते.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image