शेती व्यवसाय आणि प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची - शरद पवार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेती व्यवसाय आणि  प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची आहे ,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पुरस्कृत, महात्मा फुले एग्रीकल्चर फर्म कृषी पदवीधर संघटनेची, आज अमरावती इथं स्थापना करण्यात आली,यावेळी घेतलेल्या पहिल्या अधिवेशन ते बोलत होते.

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं  आवश्यक आहे. शेती व्यवसाय समृध्द करायचा असेल तर शेतकऱ्यांसोबत कृषी पदवीधारकांना  बळ  देऊन त्याच्या पाठशी उभं  राहणं आवश्यक असल्याचं पवार म्हणाले.  येत्या काळात शेतकऱ्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस ही कृषी पदवीधारकांच्या भक्कमपणे पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही शरद पवार यांनी यावेळी दिली. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image