प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची दिली कबुली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची कबुली दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की, उच्च-गुणवत्तेची आणि स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचं हे यशस्वी उदाहरण आहे. निरोगी भारतासाठी आरोग्य विभाग परिणामकारक योगदान देत असल्यानं  लोकांना मदत होत आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये, मोदींनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी, रेल्वे स्थानकावर पारंपारिक लोकसंगीतानं दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी त्रिशूरच्या लोकांचं कौतुक केलं.