अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादचं नाव न बदलण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी विभागांना निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या पीठासमोर झालेल्या या सुनावणीत, दहा जूनपर्यंत टपाल कार्यालय, महसूल, पोलिस

ठाणे इत्यादी प्रशासकीय विभागांची नावं बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितलं. यासंदर्भात पुढची सुनावणी सात जून रोजी होणार आहे. 

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image