स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात महत्वाची भूमिका बजावणार - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात  महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं नागरी सेवा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. कोविड-१९ महामारीचं आव्हान असूनही, भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचं ते यावेळी म्हणाले. अमृत काळात, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्न पूर्ण करणं, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सार्वजनिक प्रशासनामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री पुरस्कार प्रदान केले.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image