उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलण्याचे परवाने दिले जाणार नाहीत- उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी देण्याची परवानगी देणं बंद करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, सध्या या प्रकल्पातून हिंगोलीसाठी राज्यपालांच्या सूचनेनुसार पाणी दिलं जात असल्याचं सांगितलं. मात्र उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी ठोस उपाय केले असून, यापुढे पाणलोट क्षेत्रातून पाणी परवाने दिले जाणार नसल्याचं ते म्हणाले. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image