पीआयबीकडून ११०० हून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालयाच्या वस्तुस्थिती तपास पथकानं आत्तापर्यंत अकराशेहून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीला आणली आहेत.  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

पीआयबीनं आत्तापर्यंत ३७ हजाराहून अधिक तक्रारी निकालात काढल्या आहेत. बनावट बातम्यांचा निपटारा करण्यासाठी सरकारकडे वैधानिक आणि संस्थात्मक यंत्रणा असल्याचं ते म्हणाले.  नियमांचं उल्लंघन झालं तर सरकार आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया योग्य ती कारवाई करेल, असं ठाकूर यांनी सांगितलं. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image