पीआयबीकडून ११०० हून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीस
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालयाच्या वस्तुस्थिती तपास पथकानं आत्तापर्यंत अकराशेहून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीला आणली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
पीआयबीनं आत्तापर्यंत ३७ हजाराहून अधिक तक्रारी निकालात काढल्या आहेत. बनावट बातम्यांचा निपटारा करण्यासाठी सरकारकडे वैधानिक आणि संस्थात्मक यंत्रणा असल्याचं ते म्हणाले. नियमांचं उल्लंघन झालं तर सरकार आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया योग्य ती कारवाई करेल, असं ठाकूर यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.