सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या कराराच्या  पाकिस्तानकडून झालेल्या उल्लंघनाबाबत येत्या नव्वद दिवसांत द्विपक्षीय  वाटाघाटीमध्ये सहभाग घेण्याची सूचना केली आहे. भारतानं कायमच सिंधू पाणी वाटप कराराचं जबाबदारीनं पालन केलं आहे. 

पाकिस्तानकडून मात्र कायमच या कराराच्या तरतुदींचं आणि अंमलबजावणीचं उल्लंघन केलं जातं.  वर्ष २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत  झालेल्या  सिंधू पाणी वाटप कराराबाबतचे  मतभेद मिटवण्यासाठी झालेल्या पाच बैठकांमध्ये भारताकडून अत्यंत जबाबदारीने प्रयत्न केले गेले आहेत. मात्र पाकिस्तानकडून याबाबत सहकार्य मिळत नाही, यामुळेच आयुक्तालयाला ही नोटीस द्यावी लागली आहे. अशी माहिती  सूत्रांनी दिली आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image