राज्यातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार, तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदा आणि सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं मिळाली आहेत. १४० अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून त्यात महाराष्ट्रातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ९३ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळणार असून त्यात  महाराष्ट्रातले चार अधिकारी आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल दिल्या जाणाऱ्या पदकांचे ६६८ मानकरी असून त्यात महाराष्ट्रातल्या ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शौर्य पुरस्कारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा क्रमांक सर्वात वरचा असून त्यांच्या ४८ अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे.नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातले २९ पोलीस अधिकारी आणि जवानांचा या यादीत समावेश आहे. नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दशकभरात पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. यादरम्यान नक्षल्यांचे अनेक मोठे नेते चकमकीत ठार झाले तर अनेकांनी आत्मसमर्पण केले.