दुधातल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या बातम्यांचं, सरकारकडून खंडन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दुधातल्या भेसळीमुळे देशातल्या जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या समाज माध्यमांवरच्या बातम्यांचं, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं खंडन केलं आहे. जर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ त्वरित तपासली नाही, तर २०२५ पर्यंत ८७ टक्के नागरिक कर्करोगासारख्या गंभीर आजारानं ग्रस्त होतील, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं भारत सरकारला दिला आहे, अशा अर्थाचं चुकीचं वृत्त समाज माध्यमातून पसरवलं जात होतं.

जागतिक आरोग्य संघटनेनं अशा प्रकारचा कोणताही सल्ला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला दिलेला नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. समाज माध्यमं आणि व्हॉट्सऍपवर प्रसारित केली जाणारी दूध भेसळीची माहिती निराधार आणि भ्रामक असल्यानं त्याकडे लक्ष देऊ नये, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image