राज्यसभेत गाजला भारत – चीन सीमाप्रश्न

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत भारत – चीन सीमाप्रश्न गाजला. या विषयी सरकारनं दिलेली माहिती अपुरी असून या विषयी विस्तृत चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. राज्यसभेत मध्यस्थता केंद्र सुधारणा विधेयक 2022 मान्य करण्यात आलं. बालमृत्यूंमध्ये मोठी घट झाल्याचंही एका लेखी उत्तरात सांगण्यात आलं. महामार्गांवर वाहनांच्या वेगमर्यादेत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

लोकसभेत काही आर्थिक पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाची आर्थिक धोरणे आणि आर्थिक स्थितीबाबत सदनाला माहिती दिली. भारत संचार निगम लिमिटेडला 1 लाख 64 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचं सरकारनं मान्य केल्याचं लोकसभेत सांगण्यात आलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image