रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असून, ग्रामसेवकांनी त्यांच्याकडे सोपवलेली कामं गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीनं करावीत, फलोत्पादन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर एक आधुनिक कांदाचाळ निर्माण करुन त्याचा खर्च, कांद्याची सुरक्षा, शेतकऱ्यांना होणारा फायदा - तोटा यांचा अभ्यास करावा, अशा सूचना भुमरे यांनी यावेळी दिल्या. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image