राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांच्या दिवंगत नेत्यांवर चिखलफेक करणं थांबवावं - राज ठाकरे यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांच्या दिवंगत नेत्यांवर चिखलफेक थांबवावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरून राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत, सावरकरांनी धोरणाचा भाग म्हणून इंग्रजांकडे दयेचा अर्ज केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image