ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या मंत्रालयानं सांगितलं. बिजली वित्त निगम कंसल्टिंग लिमिटेड त्यासाठी नोडल एजंसी म्हणून काम करेल. या कंपनीनं या योजनेसाठी निविदा मागवल्या आहेत. हा पुरवठी पुढच्या वर्षी एप्रिलपासून सुरू होईल. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडनं या योजनेत सारस्य दाखवलं आहे. येत्या २१ डिसेंबरपर्यंत या निविदा दाखल करायच्या आहेत. पहिल्यांदाच शक्ती योजनेअंतर्गत अशा बोली लावल्या जात आहेत. देशात कोयला उत्पादन वाढीसाठी २०१८ मध्ये शक्ती योजना सुरू झाली. कोळशाच्या कमी पुरवठ्यामुळे संकटात सापडलेल्या वीज कंपन्यांना कोळसा पुरवणे हा त्यामागचा हेतू आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.