शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं, दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरुपात बाजू मांडायला सांगितलं आहे.

दोन्ही बाजूंनी कोणते मु्द्दे मांडले जातील आणि कोणते वकील बाजू मांडतील, याची माहितीही द्यावी, असं देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. १६ आमदारांची अपात्रता यासह इतर याचिका घटनापीठासमोर आहेत.