21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण - नरेंद्र मोदी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. भारताची वाटचाल विकासाच्या मार्गावर वेगानं होत असून देशातली कल्पकता, प्रतिभा आणि तंत्रज्ञानानं जगात ठसा उमटवला असल्याचं ते म्हणाले. औषध आणि लशींमधे देश स्वयंपूर्ण असल्यानं कोविडसारख्या महामारीत साऱ्या जगाला मदत करु शकला. याचा उल्लेख त्यांनी केला. ओदिशात कटक इथं भारत इंडोनेशिया दरम्यानच्या दृढ सांस्कृतिक संबंधांचं प्रतीक असलेला बाली जात्रा महोत्सव सध्या साजरा होत आहे अशी माहिती त्यांनी दिली. इंडोनेशियात स्थायिक झालेल्या भारतीयांनी तिथल्या विकासात दिलेल्या योगदानाचा आपल्याला अभिमान वाटतो असं ते म्हणाले. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image