कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य सुदृढ आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता -प्रल्हाद जोशी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य अधिक सुदृढ होण्याची आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय कोळसा आणि खान तसेच संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. काल नागपूरात जोशी यांनी वेस्ट्रेन कोलफील्ड लिमिटेड(WCL) (वेकोली) च्या कामाचा आढावा घेतला.

प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते वेकोली पेंच क्षेत्रातील बाळ गंगाधर टिळक इको पार्कचे ऑनलाइन उदघाटन करण्यात आले. कोळसा क्षेत्रातील वर्तमानाची स्थिती आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल त्यांनी यावेळेला सविस्तर चर्चा केली. बैठकीला वेकोलीचे सहप्रबंध संचालक मनोज कुमार, कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व्ही. के. तिवारी यासह वेकोलीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image