दिवाळी सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त गाड्या सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात १ हजार ४९४ अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

२१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या बस धावणार असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सर्व प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असं आवाहनही चन्ने यांनी केलं आहे.

दरम्यान, एसटी महामंडळानं 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन चन्ने यांनी केलं आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image