भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे की, काही विकसित देशांमध्ये अर्थव्यवस्थेतील मंदी आणि परिणामी मागणीतील मंदीमुळे काही क्षेत्रांतील निर्यातीत घट झाली आहे. बिगर पेट्रोलियम आणि बिगर - रत्ने आणि जवाहिऱ्यांची निर्यात या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरमध्ये १५८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५.५३ टक्क्यांनी वाढली आहे. मंत्रालयानं सांगितलं की, देशानं या वर्षी सप्टेंबरमध्ये ३२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यापारी मालाची निर्यात केली असली तरी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत निर्यातीत ३.५२ टक्क्यांनी घट झाली आहे.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image