राज्याच्या विविध जिल्ह्यांतील १०७९ ग्रामपंचायतींसाठी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध १८ जिल्ह्यांमधील १ हजार ७९ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी काल सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल ही माहिती दिली. सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी देखील काल मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगाने १ हजार १६५ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंच पदाच्या; तर काही ठिकाणी सदस्य पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल प्रत्यक्षात १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. या सर्व ठिकाणी आज मतमोजणी होणार आहे. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image