दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला १५ दिवसात मान्यता देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडलेल्या दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली.  ते ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

काल नागपूरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो. या वर्षी कमलाताई रा. गवई कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या तर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image