दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला १५ दिवसात मान्यता देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडलेल्या दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. ते ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.
काल नागपूरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो. या वर्षी कमलाताई रा. गवई कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.