वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानं युवकांच्या हातून रोजगार निसटला अशी आदित्य ठाकरे यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातून एकेक प्रकल्प चालले असून वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानं युवकांच्या हातून रोजगार निसटला, अशी टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याजवळ वडगाव इथं जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड काळात महाविकास आघाडी सरकारनं गुंतवणूक आणली. युवकांच्या पाठीशी शिवसेना आहे, असं त्यांनी सांगितलं. वेदांत प्रकल्पासाठी तळेगावची जागा उत्तम होती. पूर्ण सवलती देऊनही प्रकल्प, घटनाबाह्य सरकारमुळे राज्याबाहेर गेला, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. या सरकारनं युवकांची स्वप्नं धुळीला मिळवली. या राज्यातल्या युवकांना रोजगार कधी मिळणार असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image