नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय

 


मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. आपत्तीग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सततच्या पावसानं ६५ मिलीमीटर पावसाच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातल्या ६ लाख शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुमारे साडे ५ लाख हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 600 कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत. 

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image