नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. आपत्तीग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सततच्या पावसानं ६५ मिलीमीटर पावसाच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातल्या ६ लाख शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुमारे साडे ५ लाख हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 600 कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.