भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात ३ पोलिसांचं निलंबन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर आज सदनात अल्पकालिन चर्चा झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image