राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ते २५ ऑगस्ट होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी १७ ते २५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अधिवेशन कालावधीत २४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.