सुधारित फौजदारी प्रकिया कायदा आजपासून देशभरात लागू
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : सुधारित फौजदारी प्रकिया (ओळख) कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. या कायद्यानुसार गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपीची शारिरीक मोजमापं, बोटांचे ठसे इत्यादी वैयक्तिक माहिती घेऊन ओळख पटवण्याच्या उद्देशाने साठवून ठेवणं शक्य होणार आहे.
डोळ्यांचा पडदा, बाहुली यांच्या प्रतिमा, तसंच इतर शारिरीक तपशील आणि गरज पडल्यास त्याच्या विश्लेषण चाचण्यांचे अहवाल राष्ट्रीय फौजदारी नोंद ब्यूरोकडं जतन करता येतील. या माहितीचा उपयोग देशभरात कुठेही अन्यत्र गुन्हा घडल्यास त्या तपासात होऊ शकतो.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.