देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९३ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा, तर १० कोटी ३४ लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे.

राज्यात आज सकाळपासून ९६ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ४० लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ५८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा, तर सुमारे ६९ लाख १२ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.