दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे - रामदास आठवले
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल फलटण इथं दिवंगत पँथर नेते चंद्रकांत अहिवळे यांच्या आदरांजली सभेत बोलत होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार सर्व विश्वानं स्वीकारला असून, देशातही आंबेडकरी विचार सर्व जाती-धर्मीयांना कळला आहे. समतेचा मानवतेचा विचार सवर्ण जातींना कळला असल्यामुळे पूर्वीसारखा तीव्र दलित- सवर्ण भेदभाव राहिला नाही, असे ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.