राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बाठीया आयोगाच्या अहवालाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं आज स्वीकारल्या, आणि त्या नुसार निवडणुका घेण्याचा आदेश दिला. कार्यक्रम जाहीर झालेल्या निवडणुका ठरल्याप्रमाणे घ्याव्यात, तसंच उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. बाठीया आयोगानं,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. राज्यात ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत, बांठिया आयोगाच्या अहवालातल्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयानं स्विकारल्या, हे मोठं यश असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची भूमिका नव्या युती सरकारनं घेतली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम बांठिया आयोगानं केलं, असं ते म्हणाले. आधीच्या महाविकास आघाडी सरकारनं हा डेटा गोळा केला नव्हता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली. तर, महाविकास आघाडी सरकारनं नेमलेल्या बांठिया आयोगानं इंपेरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्टची पूर्तता केल्यानं ओबीसी आऱक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image