राज्यात २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार ३३६ नव्या रुग्णांची नोंद झाली, २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८० लाख ३२ हजार २४६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७८ लाख ६९ हजार ५९१ रुग्ण बरे झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात १४ हजार ५९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.