भारत नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत अग्रस्थानी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात चांगवॉन इथं आयोजित नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारतानं ३ सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह एकूण ८ पदकांची कमाई केली आहे. आज दहा मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुता, शाहू तुषार माने, आणि पार्थ मखेजा या त्रिकुटांना दक्षिण कोरियाच्या संघावर १७-५ नं मात करत देशाला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं, तर याच प्रकारात महिलांमधे एलावेनी वलावीरन, मेहुली घोष आणि रमिता यांनी रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारतीय संघानं इटलीच्या अनुभवी संघाशी चुरशीची लढत दिली. त्यांना १५-१७ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिलं. याच प्रकारात महिला संघानं कोरियाच्या दर्जेदार संघाचा सामना करत रौप्य पदक मिळवलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image