हर घर तिरंगा मोहिमेवर कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी खर्च करण्याचे केंद्र सरकारचे खाजगी कंपन्याना निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी म्हणजे CSR निधी हर घर तिरंगा मोहिमेशी संबंधित कार्यक्रमांसाठी खर्च करू शकतात, असं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.

काल जारी केलेल्या परिपत्रकात मंत्रालयानं स्पष्ट केलं की या मोहिमेशी संबंधित कृतींसाठी जसे की राष्ट्रध्वजांची निर्मिती, पुरवठा, ध्वज पोचवणे, इत्यादी संबंधित गोष्टींसाठी कंपन्या हा निधी खर्च करु शकतात. या संबंधित सूचना कंपनी कायद्याच्या अनुसूची ७ अंतर्गत देण्यात आल्या आहेत. 

परिपत्रकात असंही म्हटलं आहे की कंपनी नियम २०१४ नुसार संबंधित परिपत्रके किंवा मंत्रालयानं जारी केलेल्या स्पष्टीकरणांच्या पूर्ततेच्या अधीन राहून ही कामं करू शकतात. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्तानं लोकांना राष्ट्रध्वज घरी आणण्यासाठी आणि तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित करणे, आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सरकारद्वारे हर घर तिरंगा मोहीम आयोजित केली आहे. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image