एकविसावं शतक हे भारताचं शतक व्हावं यासाठी देश सज्ज होत आहे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकविसाव्या शतकाला “भारताचं शतक” बनवण्याच्या दिशेनं देश सक्षम पावलं टाकत आहे असा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल व्यक्त केला. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी राष्ट्राला उद्देशून निरोपाचं भाषण केलं. भारताला अधिकाधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या रूपानं आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित आहे, असं कोविंद म्हणाले. पुढच्या महिन्यात आपण स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत; त्याचबरोबर आपण स्वतंत्र्याच्या शताब्दीकडे नेणाऱ्या २५ वर्षांच्या ‘अमृत काळातही” प्रवेश करत आहोत. ही वर्ष आपल्या देशाच्या प्रगतीपथावरील मैलाचा दगड ठरणार आहेत. हे अमृत पर्व म्हणजे आपण आपल्या क्षमता ओळखून, त्यांना मूर्तरूप देत, जगासमोर “श्रेष्ठ भारत” सादर करण्यापर्यंतचा एक प्रवास आहे असं राष्ट्रपती म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.