एक दिवस शाळेसाठी असा उपक्रम राबवण्याचं डॉक्टर भारती पवार यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणांनी बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होता.

 मालेगाव मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणारे ६० पूर्णांक ८ दशांश टक्के, तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण २५ पूर्णांक ४ दशांश टक्के इतकंच प्रमाण आहे. त्यामुळे मालेगावमध्ये लसीकरणाबाबत जागृती करावी असं आवाहन त्यांनी केलं.  

शासनाच्या ई संजीवनी टेली मेडिसिन तसंच वन नेशन वन राशन या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच ग्रामीण भागातली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी एक दिवस शाळेसाठी असा उपक्रम राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image