राज्यात कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८० लाख ३४ हजार २६१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७८ लाख ७१ हजार ५०७ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४८ हजार ६२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १४ हजार ६९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे.पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार राज्यात बी ए-फोरचे दोन, तर बीए फायचे २८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए 2.75 चे १८ रुग्ण आढळले आहेत.