केंद्र सरकारकडून विविध धान्यांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज 2022-23 हंगामातल्या सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मान्यता दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की मंजूर केलेले दर देशातल्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक दरवाढ तीळ, मूग, सूर्यफूल, तूर, उडीद आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये करण्यात आली आहे.
याशिवाय कापूस,सोयाबीन, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांच्याही किमान आधारभूत किमतीत वाढीची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना खात्रीशीर किमतीची हमी मिळेल आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल असं ही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.