पंढरपूर वारीसाठी २ वर्षांनंतर त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची पालखी रवाना
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे रवाना झाली. त्यात ४६ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. काेरोनामुळे बंद ठेवलेला पायी पालखी सोहळा तब्बल दोन वर्षानी पुन्हा एकदा सुरू झाल्यानं वारकरी आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रथेप्रमाणे संजीवन समाधी मंदिरात विधिवत पूजा, आरती झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका सजवलेल्या पालखीतून मंदिरा बाहेर उभ्या असलेल्या रथामध्ये ठेवण्यात आल्या. पालखीचा आज संध्याकाळचा मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर इथं आहे. त्यानंतर उद्या सकाळी पालखी सिन्नर कडे रवाना होईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.